यवतमाळ जिल्हा
यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी यवत अथवा यवते असावे असे मानले जाते. या यवत
किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा यवते चा महाल (परगणा
किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले असावे. अकबराच्या
दरबारातील अबूल फजल याने लिहिलेल्या ऐन-ई-अकबरी मध्ये यवतचा योत-लोहार असा
उल्लेख आढळतो. लोहार हे यवतमाळच्या पश्चिमेस पाच कि.मी. अंतरावर असलेले
खेडेगाव असून योत हा यवताचा उर्दू अपभ्रंश असावा. गोंड, वाकाटक, चालुक्य,
राष्ट्रकूट, यादव या घराण्यांच्या सत्ता विविध कालखंडांत यवतमाळवर होत्या.
ब्रिटिश काळात वर्हाड प्रांतात १८६४ साली या जिल्ह्याची स्थापना झाली. त्या
वेळी हा जिल्हा वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात असे. १९०५ मध्ये या
जिल्ह्याचे यवतमाळ असे नामांतर झाले. १९५६ पर्यंत हा जिल्हा मध्यप्रदेश
राज्यात होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेत हा जिल्हा मुंबई राज्यात, तर
दिनांक १ मे, १९६० पासून महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला.
शेती
कापूस म्हणजेच पांढरे सोने हे या जिल्ह्याचे
मुख्य कृषिविषयक वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र
८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे.ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून कापूस
हे प्रमुख व्यापारी पीक आहे. जिल्ह्यात ज्वारी, तांदूळ, भुईमूग ही खरीप तर
गहू, हरभरा ही रब्बी पिके घेतली जातात. पुसद, उमरखेड व महागाव या तालुक्यात
उसाचे पीकही घेतले जाते. येथे काही ठिकाणी द्राक्षांचेही मळे आहेत.
राळेगाव, कळंब या भागात संत्र्याच्या व केळीच्या बागा आहेत. लाडखेड,
दारव्हा, दिगस व उमरखेड या ठिकाणी विड्याच्या पानांचे मळे आहेत.
लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता यवतमाळ जिल्ह्याचा कापसाच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक आहे. तसेच कापसाच्या उत्पादनातही यवतमाळचा क्रमांक पहिल्या तीन जिल्ह्यांत आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
यवतमाळ शहरात कृषी संशोधन केंद्र व कुक्कुट पैदास केंद्र आहे.
लागवडीच्या क्षेत्राचा विचार करता यवतमाळ जिल्ह्याचा कापसाच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक आहे. तसेच कापसाच्या उत्पादनातही यवतमाळचा क्रमांक पहिल्या तीन जिल्ह्यांत आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
यवतमाळ शहरात कृषी संशोधन केंद्र व कुक्कुट पैदास केंद्र आहे.
पर्यटन :
कळंबः येथे २१ गणेशपीठांपैकी श्री
चिंतामणी गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. मंदिर जमिनीपासून १२ मीटर खोल आहे.
पायर्या उतरताच गणेशकुंड लागते. या कुंडाच्या शेवटी गणपतीची ४ फूट उंच
डाव्या सोंडेची मूर्ती आहे. कळंब हे एक पुरातन गाव असून येथील उत्खननामध्ये
सोन्याची नाणी व अनेक मूर्ती सापडल्या आहेत.
यवतमाळ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले श्री केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
वणी : या निरगुडा नदीकाठी वसलेल्या
गावात श्री रंगनाथ स्वामी यांची समाधी आहे. सद्गुरू परमहंस जगन्नाथबाबा
यांचे नंदेश्वर हे देवस्थान असून येथे विष्णू व शिव या दोघांच्याही मूर्ती
आहेत. वणीपासून जवळच मंदर या गावाजवळ उत्खननात प्राचीन आवशेष सापडले आहेत.
पुसदः पूस या नदीच्या काठावरील पुसद हे
एक प्राचीन ऐतिहासिक नगर आहे. येथे वाकाटककालीन शिवमंदिराचे अवशेष सापडले
होते. नदीकाठावर करूणेश्वर, पंचलिंगेश्वर, हरकेश्वर व जागेश्वर ही पुरातन
मंदिरे आहेत. पुसद तालुक्यातील बेलोरा येथे केदारलिंगाचे भव्य मंदिर आहे.
येथे नदीचा आकार ज्योतिर्लिंगासारखा असल्याचा भासतो. पुसद तालुक्यातच हर्षी
येथील टेकडीवर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. तसेच जवळच जगदंबा मातेचेही
जागृत देवस्थान आहे.
मुरली : पैनगंगा नदीवर या गावाजवळ असलेला सहस्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे.
0comments
Post a Comment